पृष्ठे

नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र 2019

नवोदय विद्यालय परीक्षा 2019 या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले प्रवेशपत्र नवोदय विद्यालय च्या वेबसईटवर उपलब्ध झालेले असुन खालिल लिंक वर क्लिक करुन आपला आय.डी.पासवर्ड टाकुन सदरील प्रवेशपत्र आपण डाऊनलोड करुन प्रिंट करून काढु शकता.
शिष्यवृत्ती आवेदनपत्रासाठी येथे Click  करा.
     *नवोदय परीक्षेचे हाॕल टिकीट/प्रवेश पत्र कसे काढावे*

_DOWNLOAD ADMIT CARD OF NAVODAYA EXAM 2019_
👇👇👇
      *यावर्षाची नवोदय परीक्षा दिनांक-०६/०४/२०१९ रोजी ११.३० ते ०१.३० या वेळेमध्ये होनार आहे.सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हाॕल टिकीट/प्रवेश पत्र/ADMIT CARD खालीलप्रमाणे सोप्या पद्धतीने काढून विद्यार्थ्यांना द्यावे*
             👇🏼🐆

OPEN - GOOGLE CHROME/MOZILA FIREFOX
              👇🏼

TYPE - https://www.nvsadmissionclasssix.in/nvs6reg/homepage
                  👇🏼

LOGIN या आॕप्शनच्या खाली USERNAME/REGISTRATION NO. व पासवर्ड टाकुन खाली CAPTCHA CODE/सांकेतिक इंग्रजी अक्षरे टाकावी.व LOGIN ह्या आॕप्शन वर क्लीक करावे.
                 👇🏼

लाॕगीन झाल्यावर वरील मेनुबारमधील
DOWNLOAD ADMIT CARD ह्या आॕप्शन वर क्लीक केल्यास PRINT ADMIT CARD असे आॕप्शन दिसेल.या ठिकाणी ENGLISH किंवा हिंदी यापैकी योग्य भाषा निवडून हाॕल टिकीट डाऊनलोड करावे.
                👇🏼

आपणाकडे प्रींटर असेल तर प्रींट काढावी.प्रींटर नसेल तर डाऊनलोड केलेली ADMIT CARD PDF मोबाईल किंवा पेन ड्राइव्ह मध्ये सेव्ह करुन NET CAFE ला जाऊन प्रींट काढू शकतात.
                  👇🏼
प्रत्येक विद्यार्थ्यांचे USERNAME/RAGISTRATION NO.व पासवर्ड वेगवेगळा आहे.त्यामुळे आपल्या शाळेची जेवढी मुले नवोदय परीक्षेला बसली असतील तेवढा वेळा आपणास लाॕगीन करावे लागेल व हाॕल टिकीट काढावे लागेल.
                   👇🏼
नवोदय फाॕर्म भरतांना आपण नोंदवलेल्या मोबाईल नंबरला USERNAME/RAGISTRATION NO व पासवर्ड आलेला आहे.आपण भरलेल्या फाॕर्मची प्रींट काढली असेल तर त्यावर असलेला ११ अंकी RAGISTRATION नंबर हा USERNAME आहे.
                     👇🏼
विद्यार्थ्याचे लाॕगीन करतांना आपण पासवर्ड विसरले असाल तर विद्यार्थ्यांची जन्म तारीखवर आधारित  पासवर्ड जनरेट झालेला असतो.
उदा- एका विद्यार्थ्याची जन्म तारीख जर १२/०५/२००८ असेल तर त्याचा पासवर्ड हा १२०५२००८ असा असेल .     

भारताचा राष्ट्रध्वज.


भारताचा राष्ट्रध्वज







भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, अंगिकारला गेला. भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवापांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत ज्यामुळे त्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

रचना


पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंग आहेत. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मधोमध निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.
रंगभावना
गडद भगवात्याग
पांढराशांती
हिरवासमृद्धी
निळाचोविस तास

भारताचा राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी,पांढरा,हिरवा,आणि निळा.(खरे पाहता आपला राष्ट्रीय राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).
२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज'भारताचा अधिकृत राष्ट्रीजय ध्वज म्हणून स्वीकृत करण्या त आला.
त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे हे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्याकत आली आहे.
- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.

- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीचा बोध होतो.


- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसदसभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे



राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.
  • ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.
  • संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.
  • राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.
  • संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
  • राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
  • ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
  • केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्यां च्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.