पृष्ठे

महात्मा ज्योतिबा फुले


महात्मा ज्योतिबा फुले

जोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव: जोतिबा, ज्योतीबा.
जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण , सातारा, महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे , महाराष्ट्र
प्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी नाव: सावित्रीबाई फुले
अपत्ये: यशवंतबालपण आणि शिक्षण
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील
कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा
जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या
वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे
गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते
फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ
झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर
तालुक्यातील खानवडी येथे आला..
तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.
खानवडी येथे फुले व होले
आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ
त्यांनी भाजी विक्रीचा
व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक
शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन
हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा
वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.सामाजिक कार्य
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले
यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून
होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व
गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची
मुक्तता करणे व त्यांना हक्काची
जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय
होते. 'सर्वसाक्षी जगत्पती ।
त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे
घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने
गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक
न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची
मागणी केली. या समाजातर्फे
पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
मराठीत मंगलाष्टके रचली.
समाजातील विषमता नष्ट करणे व
तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे
सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या
कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या
खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“ विद्येविना मती
गेली। मतीविना
नीती
गेली।
नीतीविना
गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ
एका अविद्येने केले।। ”
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी
सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास
प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ
झालेली भारतातील पहिली
महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे
स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे
महात्मा फुले पहिले भारतीय होत.
वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे
शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या
विचारवंताच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष
प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि
समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ
होत असत. ही सामाजिक परिस्थिती
सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे
आपल्या पत्नी सावित्रीबाईंना १८४८
साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील
भिडे यांच्या वाड्यात पहिली
मुलींची शाळा काढून
तेथील शिक्षिकेची
जबाबदारी सावित्रीबाईंवर
सोपविली. महाराष्ट्रातील
स्त्री शिक्षणाची ही
मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य
मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत
१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या
कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण
जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज
सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी
व व्यापक करण्यासाठी १८७३ साली
त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची
स्थापना केली. ‘कोणताही धर्म
ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व
जातिभेद ही निर्मिती
मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र
या विश्वाची निर्मिती
करणारी कोणती तरी
शक्ती आहे अशी
त्यांची (अस्तिक्यवादी)
विचारसरणी होती. मानवाने
गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी
लिहिलेल्या ‘शेतकर्याचा असूड’ या पुस्तकातून
महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक
दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद
केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा
क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे
दर्शन होते. ‘नीती हाच
मानवी जीवनाचा आधार आहे’ हा
विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक
व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतातसाहित्य आणि लेखन
' सार्वजनिक सत्यधर्म ' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण
ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून
' दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या
धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड'
रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला
'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील
कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित
केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा
अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा
ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.सन्माननीय
उपाधी
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल
घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही
उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले
हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.
नाव साहित्यप्रकार लेखनकाळ
इशारा लेखसंग्रह इ.स. १८८५
गुलामगिरी लेखसंग्रह इ.स. १८७३
तृतीय
रत्न नाटक इ.स. १८५५
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह इ.स. १८६९
राजे
छत्रपती
शिवाजी
राजे भोसले यांचा
पोवाडा
पोवाडा इ.स. १८६९
शेतकर्यांचा असूड लेखसंग्रह -
Align="Center"
सार्वजनिक
सत्यधर्म लेखसंग्रह इ.स. १८८९जीवनपट
इ.स. १८२७ - जन्म कटगुण , सातारा जिल्हा
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत
शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये
इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व
इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या ' राईट ऑफ मॅन ' या ग्रंथाचा
अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या
मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून
अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील
मुलींची पहिली शाळा सुरू
केली. बहुजन समाजाच्या
शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत
मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची
स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत
अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू
केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी
यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश
सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - ' दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द
एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स ' स्थापन
केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ
शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात
केली.
इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा
प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून
निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची
स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप
घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील
हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना
केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध
खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर ).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद
सरस्वतींची पुण्यात मिरवणूक
काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध
केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना
'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या
कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन
दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत
देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन
मंगलाष्टकांची व नवीन
पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय
विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट
आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा
येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून
'महात्मा' ही पदवी प्रदान
केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,
त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर
प्रवास.
परि स्त्री शिक्षण; हा एकची असे
ध्यास, हा एकची असे ध्यास,
या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव
फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व
स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा
कृतीशील क्रांतिकारकाचा होता.
महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून
जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते
थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक
म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते
सामान्यांतील असले तरी विचाराने व
कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध
ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व
समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन
करता येईल. महाराष्ट्रातील
सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक
होते.

बालदिन, चाचा नेहरू.

पंडितजींच्या हृदयातील एक अमुल्य ठेवा होता. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. ''मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे'', याबाबत ते आग्रही असत. 14 नोव्हेंबर हा नेहरुंचा जयंतीदिन खर्‍या अर्थाने 'बालदिन' म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. पंडित नेहरुंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 संस्कृत पंडित म्हणून ख्याती   
नेहरु घराणं हे मुळचं काश्मिरातलं. त्यांच्या पुर्वजांची संस्कृत पंडित म्हणून जनमानसात ख्याती होती, म्हणूनच सारस्वत ब्राह्मण असलेल्या या घराण्याला 'पंडित' म्हणण्याचा प्रघात होता. अलाहाबाद येथील त्यांच आनंदभवन राजेरजवाड्यांनाही मोह पडल इतकं भव्य व आकर्षक होत. मोतीलाल व स्वरुपराणी या समृद्ध व सुखी दांपत्याला 14 नोव्हेंबर 1889 रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे शिक्षण विलायतेत झालं होतं, तरी देखील हिंदुस्थानातून ब्रिटिश राजवटीचा शेवट कसा होईल यांचा त्यांना सदैव ध्यास असे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत बॅरिस्टर पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली. त्यानंतर त्यांनी गांधीजींच्या ब्रिटीश सरकारविरुद्ध पुकारलेल्या असहकार चळवळीत उडी घेतली.
                     ऑगस्ट क्रांतीचा वणवा  
मुंबईच्या गवालिया टँक येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरलं होतं. याप्रसंगी महात्मा गांधी, मौलाना आझाद सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांना चलेजाव चा सज्जड इशारा दिला. यावेळी नेहरु आपल्या भाषणात म्हणाले की, ''या लढ्यात आता माघार नाही. यात आम्ही विजय मिळवून आझाद हिंदुस्थानाच्या भूमीवर उभे राहू, अन्यथा खवळलेल्या महासागरात बुडून जगातून नाहिसे होऊ.'' करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची घोषणा करुन त्यांनी जनमानसाच्या अंत:करणात क्रांतीची प्रखर ज्योत प्रज्वलित केली.
इंदिराजींची उत्तम जडणघडण 
प्रत्येक देशातील ज्येष्ठ नेते व तेथील परराष्ट्रीय धोरणाची माहिती व्हावी, यासाठी नेहरु हे इंदिरा गांधींना आपल्यासोबत परदेश दौर्‍यात नेत असात. त्यामुळे इंदिराजींची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्यांशी ओळख झाली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य लढ्याची तसेच त्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांचा परिचय व्हावा, याकरिता नेहरुनी इंदिराजींना महात्मा गांधीच्या सहवासात ठेवलं. त्यामुळे इंदिराजींच्या मनात क्रांतीची भावना निर्माण होऊन त्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या व त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. पंडितजींनी इंदिराजींची बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जडणघडण उत्तमरित्या केल्याने त्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या. इतकेच नव्हे तर त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्या म्हणून गणल्या गेल्या. 
        अलिप्तवाटी राष्ट्रगटाची उभारणी  
नेहरु हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पराराष्ट्र खातं त्यांनी आपल्याकडेच ठेवलं. अमेरिका व रशिया या दोन महाशक्तिंशी नेहरुंचे मित्रत्त्वाचे संबंध असल्याने एकाशी मैत्री, तर दुसर्‍याशी शत्रूत्त्व करण्यात त्यांना स्वारस्य नव्हतं. यासाठी त्यांनी अलिप्तवादी धोरण अंगिकारले. देशा-देशांमधील कोणताही वाद-तंटा शांततेने, वाटाघाटीवरुन, सामोपचाराने सोडविण्याचे कौशल्य पंडितजींच्या अंगी होत. ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान विल्यम चर्चिल यांनी You are the light of asia या शब्दात नेहरुंचा गौरव केला. पं‍डीतजींच्या आंतरराष्ट्रीय किर्तीची ही पावतीच ठरली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरुंना 1955 साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले.  

पंचशील तत्त्वाद्वारे शांतीचा संदे
जगात शांतता व सह-जीवनाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी विश्वशांतीचा ध्वज खाद्यांवर घेऊन नेहरुंनी पंचशील तत्त्वांची आखणी केली. परस्परांचे राष्ट्रीय व प्रादेशिक ऐक्य व सार्वभौमत्त्वाचा भंग करु नये, एकमेकांवर आक्रमण करु नये, एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करु नये, परस्परांच्या समानतेला व हितसंबंधाला धक्का पोहोचू नये आणि शांततामय सह-जीवनाभर भर द्यावा. विशेष म्हणजे चीन सारख्या बलाढ्य राष्ट्राला देखील नेहरुंनी पंचशील तत्त्वे स्वीकारण्यास भाग पाडले. जगभरात शांतीदूत म्हणून नेहरुंची ख्याती होती.
आधुनिक भारताचे शिल्पका
औद्योगिक व कृषी क्षेत्रात संपन्नता लाभल्याशिवाय जगाच्या स्पर्धेत भारत टिकणार नाही याची पक्की जाण नेहरुंना होती. कृषी उत्पन्न वाढावे तसेच वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नेहरुंनी पंजाबमध्ये भाकरानांगर, ओरिसात हिराकुड, आंध्रप्रदेशात नागार्जुन सागर हे मोठे प्रकल्प सरकारी पैशांतून उभारले. आणखी एक पाऊल पुढे जाऊन पंडीतजींनी उद्योगपती टाटाच्या मदतीने जमशेदपूर येथे पोलादाचा कारखाना, रशियाच्या साहाय्याने मध्यप्रदेशात भिलाई येथे पोलादाचा कारखाना, ‍ब्रिटनची मदत घेऊन पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर येथे, तर जर्मनीच्या साहाय्याने ओरिसातील सरकेला येथे पोलादाचे कारखाने स्थापित केले. शेत जमीन सुपिक व्हावी व तिचा कस वाढवा यासाठी बिहारमधील सिंद्री येथे खत कारखान काढण्यास नेहरुंनी चालना दिली, 'औद्योगिक व कृषी विकासासाठी धरणं व पोलाद कारखाने ही भारताची आधुनिक मंदिरे होत.' असं नेहरुंच पुरोगामी धोरणं होतं.
मुलं देवा घरची फुलं
मुला-फुलांबाबतचा जिव्हाळा नेहरुंच्या रोमारोमात भिनलेला होता. एक दा तर होळीच्या दिवशी त्यांच्या निवासस्‍थानी शाळकरी मुलं आली आहेत, हे कळताच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उठून ते मुलांवर रंग उधळण्यासाठी मुलांच्या दिशेने धावले. मुठीमुठीने त्यांनी मुलांवर गुलाल उधळला. परंतु आपल्यावर गुलाल उधळण्यास मुले संकोच करीत असल्याच पंडितजींना जाणवलं. मी तुम्हांला मोठा वाटतो का? असे असेल तर मी खाली बसतो आणि सांगा बघू आता, कुठे आहे मी मोठा? झालो की नाही आता लहान! अगदी तुमच्या एवढा! आता चला उडवा माझ्यावर गुलाल! आपलं वय विसरुन, आपलं मोठेपण विसरुन ते लहान मुलांमध्ये लहान होत असत. जणू अगदी बाल नेहरुच! मुलांना ते 'देवा घरची फुलं' अशी उपमा देत असतं. म्हणूनच मुलं पं‍‍डितजींना आदरानं चाचा नेहरु म्हणत असतं.